AI Revolution|कृषि क्षेत्रात आता ‘एआय’ क्रांती

AI Revolution|कृषि क्षेत्रात आता 'एआय' क्रांती

AI Revolution|कृषि क्षेत्रात आता ‘एआय’ क्रांती

महाराष्ट्राच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या ‘महाराष्ट्र कृषि -कृत्रिम बुद्धिमता महाग्री-एआय धोरण २०२५-२९’ला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली .या धोरणामुळे कृषि मध्ये कुत्रिम बुद्धिमता (एआय),निर्मितीक्षम कुत्रिम बुद्धिमता (जनरेटिव्ह एआय),इंटरनेट ऑफ थिंग्ज ,ड्रोन ,संगणकीय दृष्टीक्षमता ,रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यांसारख्या उद्योन्मुख्त तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तार योग्य उपाययोजना राबविता येणार आहेत .या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या तीन वर्षासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे .

महाग्री-एआय धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

महाग्री -एआय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्रिस्तरीय प्रशासकीय संरचना असून पुढील पाच वर्षात या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार असून राज्यातील ग्रीस्टॅक,महा-ग्रीस्टेक ,महावेध ,क्रोप सॅप,गमार्कनेट ,डिजिटल शेती शाळा ,महा-डीबीटी यांसारख्या प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार आहे .त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती ,राज्यस्तरीय तांत्रिक समिती ,कृत्रिम बुद्धिमता आणि ग्रीटेक नाविन्यता केंद्र ,कृषि विद्यापीठांतर्गत कृषि कृत्रिम बुद्धिमता संशोधन व नाविन्यता केंद्र काम करतील .

५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार

या धोरणाच्या माध्यमातून राज्यात कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमता व नाविन्यतेसाठी एक अग्रगण्य केंद्र निर्माण होईल .तसेच कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा शेतकरी-केंद्रित वापर ,संशोधन ,डेटा देवाण-घेवाण वाढेल , स्टार्टअप्सना पाठबळ मिळेल आणि यातून महाराष्ट्र डिजिटल कृषि नाविण्यातेम्ध्ये आघाडीवर राहील ,अशी अपेक्षा आहे .या धोरणाद्वारे कृत्रिम बुद्धिमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शेतकरी केंद्रित वापर करण्यास स्टार्टअप्स,खासगी संस्था ,शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक संस्था आदींना चालना मिळेल ,असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत .

AI Revolution|कृषि क्षेत्रात आता 'एआय' क्रांती

शेती संबधित सर्व डेटाबेस जोडणार

आयआयटी-आयआयएस्सी सारख्या संस्थांच्या मार्गदर्शनखाली राज्यातील चार कृषि विद्यापीठांमध्ये कृषि -कृत्रिम बुद्धिमता नाविन्यता आणि इंक्यूबेशन केंद्र स्थापण्यात येतील .डेटा आधारित शेती आणि कृत्रिम बुद्धिमता वापरासाठी उपयोगी ठरतील अशा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील .क्लाउड आधारित कृषि डेटा एक्स्चेंज आणि सॅडबॉक्सिंग सुविधा उपलब्ध केली जाईल.या डिजिटल प्लॅटफॉर्मशी केंद्र व राज्य शासनाचे शेती संबधित सर्व डेटाबेस जोडण्यात येतील (उदा.ग्रीस्टॅक,महावेध ,महा-ग्रीटेक ,क्रॉपसॅप ,गमार्क नेट ,डिजिटल शेतीशाळा ,महा-डीबीटी इ.) या एक्स्चेंजद्वारे शेतकरी ,त्यांची जमीन ,पीक माहिती ,स्थानिक हवामान ,मृदा आरोग्य ,इ.डेटा कृत्रिम बुद्धिमता प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे .

1.शेतापासून ग्राहाकापर्यंत जिओ टॅगिग

अन्न सुरक्षा ,पुरवठा साखळीतील पारदर्शकता ,अन्न गुणवत्ता हमी आणि शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी एआय,ब्लॉकचेन आणि क्युआर -कोड तंत्रज्ञानावर आधारित राज्यव्याप्ती शोध क्षमता व गुणवत्ता प्रमाणीकरण प्लॅटफॉर्म उभारण्यात येईल .

2.या प्लॅटफॉर्म द्वारे शेतापासून ग्राहका पर्यंतच्या प्रवासात पिकांना दिलेली खते व औषधे ,शेती पद्धती ,कापणी पश्चात प्रक्रिया व गुणवत्ता प्रमाणपत्र इत्यादी बाबीचे डिजिटल आणि जिओ टॅग केलेली नोंदवही तयार करेल.

3.शेतकरी उत्पादक संस्था ,निर्यातदार ,पॅक हाउसेस,गुणवत्ता प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था ,लॉजिस्टिक्सव ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यांना या प्रणालीशी जोडले जाईल .

4.कृषि विद्यापीठामध्ये प्रशिक्षण

राज्य कृषि विद्यापीठे,तांत्रिक संस्था आणि संशोधन भागीदारांमध्ये व कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल.

5.कृषि विभागातील अधिकाऱ्यांसाठी विशेष कृत्रिम बुद्धिमता वापराबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण ,डिजिटल साधने आणि मदत कक्ष उपलब्ध करून दिले जातील.

गावागावांत उभारणार हवामान केंद्र

केंद्र सरकारच्या विंड्स (थखछउड -वेदर इन्फोर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम ) प्रकल्पअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवानाम केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे .यासाठी महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .केंद्राची उभारणी झाल्यास दुष्काळ ,आग,पूर,गारपीट,ढगफुटी,थंडीची लाट,कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे .राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठी तसेच शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषिविषयक सल्ला आणि मार्गदर्शक मिळावे यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे .या प्रकल्पात राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे .या केंद्र द्वारे तापमान ,पर्जन्यमान,सापेक्ष आद्रता ,वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते .