
राज्यात १३ जिल्ह्यांसाठी नवी योजना
अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी अॅ टीहेलनेट कव्हर योजना सुरु करण्यात आली आहे .यात सोलापूरसह राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश आहे .या योजनेतून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे .डाळिंबाच्या कव्हरसाठी २००००० अनुदान २०२५
डाळिंब हे महाराष्ट्रातील कोरडवाहू प्रदेशात घेतले जाणारे महत्वाचे फळ पीक आहे .डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस ,गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती ना सतत सामोरे जावे लागते .त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व निर्यात क्षम डाळिंब पिकाचे उत्पादन घेण्यास मर्यादा येतात .डाळिंबाच्या कव्हरसाठी २००००० अनुदान २०२५
महाडीबीटी प्रणालीवर अंमलबजावणी
अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती पासून डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी अॅ टीहेलनेट कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश केला आहे .जिल्ह्यांस २०२५-२६ साठी ३१ हेक्टरसाठी एक कोटी ६४ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे . त्यानुसार राष्ट्रीय कृषि विकास योजनेतर्गत डाळिंब पिकासाठी अॅ टीहेलनेट कव्हर या घटकाची प्रमुख उत्पादक जिल्ह्यामध्ये महा डी बी टी प्रणालीवर अंमलबजावणी केली जात आहे .
प्रति लाभार्थी 20 गुंठे ते एक एकरसाठी लाभ
क्षे त्र मर्यादा 20 गुंठे ते एक दरम्यान प्रति लाभार्थी लाभ दिला जाईल .प्रति एकर चार लाख २४ हजार ६४० रुपये खर्चाचे मापदंड आहेत .अनुदान मर्यादा ही प्रति एकर दोन लाख 12 हजार ३२० रुपये म्हणजेच खर्चाच्या ५० टक्के आहे .